news
पिंपरीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा भव्य कामगार मेळावा; कंत्राटदारांच्या मनमानी कारभाराविरोधात यशवंतभाऊ भोसले कडाडले!पिंपरी-चिंचवडचे २१ ‘बाहुबली’ खेळाडू आंतरराष्ट्रीय मैदानावर फडकवणार तिरंगा; भारतीय सिलंबम संघात झाली निवड!भोसरी एमआयडीसीतील बकाल कारभाराविरोधात उद्योजक आक्रमक; ७२ तासांत अतिक्रमण न हटवल्यास मनपा भवनाला टाळे ठोकण्याचा इशारा!पुणे महापालिकेत ऐतिहासिक दर्गा तोडल्याप्रकरणी प्रचंड गदारोळ; राष्ट्रवादीचे नगरसेवक गफूर पठाण यांच्या अंगावर धावले भाजप नगरसेवक!पिंपरी-चिंचवड मनपाच्या ‘झिरो वेस्ट’ मोहिमेला अथांग यश; महिनाभरात ११ हजार किलोहून अधिक कचऱ्याचे स्रोतस्तरावर वर्गीकरण!
Home मुख्यपृष्ठराजकारण आयुक्तांकडून विधानसभा उपाध्यक्षांच्या आदेशाला केराची टोपली! हक्कभंगाची कारवाईची मागणी!

आयुक्तांकडून विधानसभा उपाध्यक्षांच्या आदेशाला केराची टोपली! हक्कभंगाची कारवाईची मागणी!

पिंपरी चिंचवडमधील वृक्षतोडीवरून वाद; लोकसेवक युवराज दाखले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी, दि. २८ एप्रिल, २०२५: पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराच्या सीमेवरून वाहणाऱ्या मुळा-मुठा, पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. या वृक्षतोडीविरोधात २७ एप्रिल २०२५ रोजी पिंपळे निलख येथे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील जागरूक नागरिकांनी निषेध मोर्चा काढला होता.

या निषेध मोर्चाची दखल घेत विधानसभा उपाध्यक्ष नामदार आण्णा बनसोडे यांनी तात्काळ वृक्षतोडीचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र, लोकसेवक युवराज दाखले यांनी आरोप केला आहे की, आयुक्त शेखर सिंह यांनी नामदार आण्णा बनसोडे यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे, जे अत्यंत चुकीचे आहे.

आयुक्त शेखर सिंह यांनी वृक्षतोडीचे काम सुरू ठेवल्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात बोलताना लोकसेवक युवराज दाखले म्हणाले की, विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेला आदेश हा विधिमंडळाचा आदेश असतो आणि आयुक्तांनी त्याचे उल्लंघन करणे हे गंभीर आहे. पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या भावनांचा आदर राखला गेला पाहिजे आणि बेकायदेशीर वृक्षतोड त्वरित थांबवली पाहिजे. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे लोकप्रतिनिधींच्या अधिकारांचा अवमान झाला आहे, त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई होणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पिंपरी चिंचवडमधील वृक्षतोडीचा मुद्दा आणि आयुक्तांवरील हक्कभंगाच्या कारवाईची मागणी यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!