news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पुणे पिंपरी-चिंचवड मनपाचा गलथान कारभार उघड! सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळेंच्या पाठपुराव्याला यश!

पिंपरी-चिंचवड मनपाचा गलथान कारभार उघड! सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळेंच्या पाठपुराव्याला यश!

वारंवार पाठपुराव्यानंतर मनपाला जाग; पिंपरीतील रस्ता दुरुस्त!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील ढिसाळ कारभाराचे आणखी एक उदाहरण पिंपरी गावातील सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी उघडकीस आणले आहे. प्रभाग ग मधील स्थापत्य विभागाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अखेर सुहास कुदळे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

पिंपरी गाव, अशोक टॉकीज रोडवरील गणेश वस्तू भंडार समोरील साई वैष्णवी सोसायटी मागील गल्लीतील पेव्हिंग ब्लॉकची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. त्यामुळे या भागातील नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. येथील नागरिक आणि श्री. सुनील अभंग यांच्या तक्रारीनंतर सुहास कुदळे यांनी सातत्याने महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे या समस्येचा पाठपुरावा केला.

त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर प्रशासनाला जाग आली आणि परिसरातील खराब झालेले पेव्हिंग ब्लॉक दुरुस्त करण्यात आले. यामुळे आता नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळाली आहे. सुहास कुदळे यांच्या या कार्यामुळे पिंपरी गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या घटनेवरून महानगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागरिकांच्या समस्यांसाठी वारंवार पाठपुरावा करावा लागणे, हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करते, असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे? महानगरपालिकेचा कारभार अधिक सुधारण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात, असं तुम्हाला वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!