news
Home मुख्यपृष्ठ प्रशांत किशोर यांच्या जन सुराजने उघडले विजयाचे खाते; राजदकडून ‘भाजपची बी-टीम’ म्हणून घणाघाती टीका

प्रशांत किशोर यांच्या जन सुराजने उघडले विजयाचे खाते; राजदकडून ‘भाजपची बी-टीम’ म्हणून घणाघाती टीका

लोकशाहीत अहंकाराला स्थान नाही; बांकीपूर अन् दतियाच्या निकालाने राजकीय पक्षांना दिला कडक इशारा | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

Zen Z चा मोठा फटका! बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाचा ऐतिहासिक विजय; भाजपच्या ३० वर्षांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग!

पिंपरी चिंचवड/पटना, प्रतिनिधी दि. ३ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

बिहार: बिहारमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा राजकीय भूकंप झाला आहे. जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांच्या उमेदवाराने शानदार विजय मिळवत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तब्बल ३० वर्षांच्या अभेद्य बालेकिल्ल्याला जोरदार धक्का दिला आहे. या निकालामुळे बिहारच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली असून भाजपसाठी ही आत्मपरीक्षणाची मोठी संधी मानली जात आहे.

विजयानंतर प्रतिक्रिया देताना प्रशांत किशोर म्हणाले की, “हा विजय केवळ एका जागेचा नसून बिहारमध्ये विकासाच्या आणि पर्यायी राजकारणाची झालेली ही नवी सुरुवात आहे. जनतेने जुन्या राजकारणाला नाकारून विश्वासाची नवी वाट निवडली आहे.”

बांकीपूरमधील जन सुराजच्या या धक्कादायक विजयानंतर राष्ट्रीय जनता दलाने (राजद) प्रशांत किशोर आणि त्यांच्या पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राजद नेत्यांनी प्रशांत किशोर यांची तुलना “लोमडी”शी करत ते भाजपची ‘बी-टीम’ म्हणून काम करत असल्याचा थेट आरोप केला. विरोधी मतांचे विभाजन करून भाजपला अप्रत्यक्ष मदत करण्यासाठीच जन सुराज पक्षाची स्थापना करण्यात आल्याचा दावा राजदने केला.

मात्र, जन सुराज पक्षाने राजदचे हे सर्व आरोप फेटाळून लावत हा विजय बिहारच्या सुजाण जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा आणि बदलाच्या तीव्र इच्छेचा परिणाम असल्याचे स्पष्ट केले.

बांकीपूरचा हा निकाल केवळ एका मतदारसंघापुरता मर्यादित नसून संपूर्ण लोकशाही व्यवस्थेला दिलेला एक स्पष्ट व सडेतोड संदेश मानला जात आहे. ज्या मतदारसंघातून एकाच पक्षाने सलग ३ दशके विजय मिळवला, तेथे मतदारांनी दिलेला बदलाचा कौल हेच सिद्ध करतो की लोकशाहीत कोणताही मतदारसंघ कोणाच्याही कायमस्वरूपी मालकीचा नसतो.

राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी पूर्वी “या मतदारसंघातून कोणालाही उभे केले तरी तो सहज निवडून येईल” असा अतिआत्मविश्वास व्यक्त केला होता. परंतु, मतदारांनी मतपेटीतून आपला कौल देत लोकशाहीत अंतिम सत्ता ही जनतेचीच असते, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.

दुसरीकडे, मध्यप्रदेशातील दतिया विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि तीव्र नाराजीचा थेट फायदा काँग्रेसला मिळाल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये रंगली आहे. स्थानिक पातळीवरील संघटनात्मक त्रुटी, पक्षांतर्गत कलह आणि कार्यकर्त्यांमधील असंतोष निवडणूक निकालांवर कसा विपरीत परिणाम करू शकतो, हे दतिया आणि बांकीपूर या दोन्ही निकालांवरून अधोरेखित झाले आहे.

सर्वच राजकीय पक्षांनी या निकालांमधून मोठा धडा घेण्याची गरज आहे. केवळ जुने विजय, पारंपरिक बालेकिल्ले किंवा अतिआत्मविश्वासावर अवलंबून न राहता जनतेसमोर सुशासन, रोजगाराच्या संधी, दर्जेदार शिक्षण, शेतकरी हित आणि पायाभूत सुविधांवरील ठोस कामगिरी मांडणे काळाची गरज बनली आहे. आजचा मतदार अत्यंत जागरूक झाला असून तो केवळ आणि केवळ प्रत्यक्ष कामाच्या आधारावरच कौल देत आहे.

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!