news
शिक्षण, कला अन् समाजकारणातील योगदानाबद्दल कल्पना क्षीरसागर यांचा पिंपरी-चिंचवड मनपालिकेत भव्य सत्कार!‘नागरिकहित अन् शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय’; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!पिंपरी महापालिकेकडून ‘माझी वसुंधरा ७.०’ अंतर्गत विशेष मोहीम; कचरा वर्गीकरणासाठी पथनाट्यांद्वारे प्रभावी प्रबोधन!‘कामगारांचा बळी घेणारी व्यवस्था खपवून घेणार नाही’; चिंचवडमधील ५ कामगारांच्या गुदमरून झालेल्या मृत्यूवर काशिनाथ नखाते आक्रमक!‘श्रमिकांच्या तळहातावर तरलाय शहराचा विकास’; हिंद रत्न कामगार पुरस्कार सोहळ्यात महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!
Home पिंपरी चिंचवड नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष अन् सत्ताधाऱ्यांचा अंतर्गत असमन्वय; ‘सनय छत्रपती शासन’ संघटनेचे महापालिका प्रशासनाला सडेतोड निवेदन!

नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष अन् सत्ताधाऱ्यांचा अंतर्गत असमन्वय; ‘सनय छत्रपती शासन’ संघटनेचे महापालिका प्रशासनाला सडेतोड निवेदन!

'सुपर महापौर' रवी लांडगे यांच्यावर दिलगिरीची नामुष्की; कायदे व नियमांचा अभ्यास करून सभागृह चालवण्याचा प्रा. नामदेवराव जाधव यांचा सल्ला | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

महानगरपालिकेत सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वसाधारण सभा तहकूब; सुपर महापौर रवी लांडगे यांच्यावर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी लक्ष्मण प्रधान, दि. ०२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड:  महानगरपालिकेमध्ये नवीन कार्यकारिणी अस्तित्त्वात आल्यापासून आतापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या ६ सर्वसाधारण सभांपैकी तब्बल ४ सभा तहकूब करण्यात आल्या आहेत. हा महाराष्ट्राच्या संसदीय इतिहासातील एक नवीन दुर्दैवी विक्रम ठरला असून, या सततच्या सभा तहकुबीमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील व्यापक जनहिताचे अनेक महत्त्वाचे प्रश्न रखडले आहेत.
सत्ताधारी पक्षाचे नेते प्रशांत शितोळे यांच्या मनमानी आणि अयोग्य कारभारामुळे महापालिकेत कित्येक वेळा जनरल बॉडी (सर्वसाधारण सभा) तहकूब करण्याची नामुष्की ‘सुपर महापौर’ रवी लांडगे यांच्यावर आली आहे. सत्ताधाऱ्यांच्या या अंतर्गत असमन्वयामुळे चक्क दोन वेळा सुपर महापौर रवी लांडगे यांना सभागृहात व नागरिकांसमोर दिलगिरी व्यक्त करावी लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

सभागृह अशा प्रकारे वारंवार तहकूब होत राहिल्याने नागरिकांना पाणी (वॉटर), सांडपाणी (गटर), वीज (मीटर), शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या अत्यंत मूलभूत व गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, ‘सनय छत्रपती शासन’ (महाराष्ट्र राज्य) या संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव यांनी जनसामान्यांच्या हितासाठी ठाम भूमिका घेत महापालिका प्रशासनाला सडेतोड निवेदन दिले आहे. हे निवेदन प्रति माननीय सुपर महापौर, माननीय आयुक्त, माननीय सभागृह नेते, माननीय विरोधी पक्षनेते आणि माननीय नगरसचिव यांना पाठवण्यात आले आहे.

आपल्या निवेदनात प्रा. नामदेवराव जाधव यांनी नमूद केले आहे की, “नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन जीवन-मरणाशी जोडलेले प्रश्न वेगाने मार्गी लावण्यासाठी सभागृह नियमित आणि पूर्ण वेळ चालणे अत्यंत अत्यावश्यक आहे.”
त्यांनी सत्ताधारी व प्रशासनाला पुढील महत्त्वपूर्ण सूचना व मागण्या केल्या आहेत. महापौर, सत्ताधारी पक्षाचे शहराध्यक्ष, सभागृह नेते, विविध समित्यांचे अध्यक्ष, कोर कमिटी आणि विरोधी पक्ष या सर्वांना विश्वासात घेऊन योग्य समन्वय साधला जावा. कायदे, नियम व सभागृह चालवण्याच्या तरतुदींचे योग्य अध्ययन, वाचन, मनन व चिंतन करून व्यापक जनहितासाठी सभागृह चालवावे.  सातत्याने सभागृह तहकूब होणे ही लोकशाहीला शोभणारी गोष्ट नाही. जनतेचे प्रश्न प्रलंबित राहिल्यास नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची जाणीव सत्ताधाऱ्यांनी ठेवावी.

 

जनसामान्यांच्या न्यायासाठी सतत कार्यरत असणाऱ्या ‘सनय छत्रपती शासन’ या संघटनेच्या माध्यमातून प्रा. नामदेवराव जाधव यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर जनतेच्या मागण्या आणि नागरी समस्या अशाच प्रलंबित राहिल्या, तर ‘सनय छत्रपती शासन’ पक्षाला जनतेची बाजू मांडण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. विविध नागरी प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेवर मोठ्या संख्येने लक्षवेधी मोर्चे काढले जातील, असा इशाराही या वेळी देण्यात आला.
प्रा. नामदेवराव जाधव यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि जनहितैषी भूमिकेतून मांडलेल्या या स्पष्ट भूमिकेमुळे शहरात त्यांच्या या कार्याचे आणि संवेदनशील नेतृत्वाचे सर्वसामान्यांमधून मोठे कौतुक व प्रशंसा होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!