news
शिक्षण, कला अन् समाजकारणातील योगदानाबद्दल कल्पना क्षीरसागर यांचा पिंपरी-चिंचवड मनपालिकेत भव्य सत्कार!‘नागरिकहित अन् शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय’; स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचे प्रतिपादन!पिंपरी महापालिकेकडून ‘माझी वसुंधरा ७.०’ अंतर्गत विशेष मोहीम; कचरा वर्गीकरणासाठी पथनाट्यांद्वारे प्रभावी प्रबोधन!‘कामगारांचा बळी घेणारी व्यवस्था खपवून घेणार नाही’; चिंचवडमधील ५ कामगारांच्या गुदमरून झालेल्या मृत्यूवर काशिनाथ नखाते आक्रमक!‘श्रमिकांच्या तळहातावर तरलाय शहराचा विकास’; हिंद रत्न कामगार पुरस्कार सोहळ्यात महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन!
Home पिंपरी चिंचवड ‘कामगारांचा बळी घेणारी व्यवस्था खपवून घेणार नाही’; चिंचवडमधील ५ कामगारांच्या गुदमरून झालेल्या मृत्यूवर काशिनाथ नखाते आक्रमक!

‘कामगारांचा बळी घेणारी व्यवस्था खपवून घेणार नाही’; चिंचवडमधील ५ कामगारांच्या गुदमरून झालेल्या मृत्यूवर काशिनाथ नखाते आक्रमक!

कामाची अधिकृत कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे प्रशासनाला आव्हान; गुरुवारी सकाळी ११ वाजता चिंचवड बीएसएनएल ऑफिसवर धडक आंदोलनाची हाक | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

जवाब दो आंदोलन! बीएसएनएल चेंबरमधील ५ निष्पाप कामगारांच्या मृत्यूला जबाबदार कोण? — कामगार नेते काशिनाथ नखाते यांचा प्रशासनाला थेट सवाल!

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बालाजी नवले, दि. ०२ सप्टेंबर २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी-चिंचवड: शहरात बीएसएनएल चेंबरमध्ये काम करत असताना विषारी वायू आणि सुरक्षेच्या अभावामुळे कै. मनोज शिंदे व कै. अमोल शिंदे यांच्यासह तब्बल ५ निष्पाप कामगारांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका कष्टकऱ्यांचे खंबीर पाठीराखे आणि ज्येष्ठ कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी घेतली आहे.
कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि सुरक्षेसाठी सदैव रस्त्यावर उतरून लढा देणाऱ्या ‘कष्टकरी संघर्ष महासंघ’ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने प्रशासनाला उघडे पाडण्यासाठी गुरुवारी ‘जवाब दो आंदोलना’चा इशारा देण्यात आला आहे.

कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या भ्रष्ट आणि निष्काळजी व्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवताना कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले की, “कामगारांचा बळी घेणारी ही व्यवस्था आता कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. या कामाची मालकी, करार (कॉन्ट्रॅक्ट) आणि जबाबदारीची सर्व अधिकृत कागदपत्रे प्रशासनाने तात्काळ जाहीर करावीत आणि दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत.”
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ५ कष्टकरी कामगारांच्या कुटुंबांवर मोठा आघात झाला असून, त्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत प्रशासनाने व संबंधित कंपनीने तात्काळ द्यावी, अशी जोरदार मागणी नखाते यांनी केली आहे.

कष्टकरी कामगारांच्या हक्कासाठी आणि मृत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली व्यापक आंदोलनाची हाक देण्यात आली आहे:
  • दिवस व तारीख: गुरुवार, दि. ०३ सप्टेंबर २०२६
  • वेळ: सकाळी ठीक ११:०० वाजता
  • स्थळ: बीएसएनएल मुख्य कार्यालय, चिंचवड, पुणे – ४११०१९

शहरातील असंसंघटित, कंत्राटी आणि कष्टकरी कामगारांवर जेव्हा जेव्हा अन्याय होतो, तेव्हा कामगार नेते काशिनाथ नखाते हे नेहमीच ढाल बनून पुढे उभे राहतात. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने लढा देत असतात. बीएसएनएल चेंबर दुर्घटनेनंतरही त्यांनी दाखवलेली ही तत्परता आणि आक्रमक भूमिका कामगारांमध्ये नवा विश्वास निर्माण करणारी ठरली असून, त्यांच्या या संवेदनशील व लढाऊ नेतृत्वाचे सर्व स्तरातून मोठे कौतुक होत आहे.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!