news
Home पिंपरी चिंचवड “आपण सारे भाऊ, मिळून खाऊ!” महापालिकेच्या विदारक स्थितीवर एका समाज माध्यमावर दिलेल्या प्रतिक्रियेवरून……

“आपण सारे भाऊ, मिळून खाऊ!” महापालिकेच्या विदारक स्थितीवर एका समाज माध्यमावर दिलेल्या प्रतिक्रियेवरून……

प्रशासकीय काळातील भ्रष्टाचाराची चौकशी होणार का? 'तोडपाणी'चा विकास आराखडा आणि 'नदी सुधार'च्या नावाखाली कोट्यवधींच्या उधळपट्टीवर उठवले प्रश्नचिन्ह.(@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी-चिंचवड मनपा: ‘नवे गडी’ पण कारभार जुनाच! विकासाचा केवळ मुखवटा; प्रशासकीय काळातील ‘भ्रष्ट’ वारसा कायम राहण्याची भीती

 

संपादकीय…..

 


२१ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाने सत्ता राखली असली, तरी शहराचे मूळ प्रश्न आणि प्रशासकीय पारदर्शकता यावर ज्येष्ठ पत्रकार यांनी जळजळीत भाष्य केले आहे. “विकास नावापुरताच असून राजकारण केवळ धंद्याचे आणि तोडपाणीचे झाले आहे,” अशा शब्दांत त्यांनी महापालिकेच्या सद्यस्थितीवर आसूड ओढले आहेत.

एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महापालिकेची अवस्था आता दयनीय झाली आहे. गेल्या नऊ वर्षांतील कारभार, विशेषतः चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत झालेल्या ‘न भूतो’ भ्रष्टाचारामुळे पालिकेची तिजोरी रिकामी झाली आहे. प्रशासकीय काळात शेखर सिंह आणि प्रदीप जांभळे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी घेतलेले अनेक मनमानी निर्णय संशयाच्या फेऱ्यात असून, या काळातील कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

नव्याने सत्तेत आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरही ज्येष्ठ पत्रकार यांनी मार्मिक टिपणी केली आहे:

  • प्रशांत शितोळे (पक्षनेते): राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या शितोळे यांच्याकडे पक्षनेतेपद सोपवणे हा कारभारी आमदारांच्या ‘जॉईंट अकाऊंट’चा भाग आहे. व्यावसायिक आणि धंदेवाल्यांची कामे करून घेण्यात ते वाकबगार असल्यानेच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचे लेखकाने म्हटले आहे.

  • रवि लांडगे (महापौर): अंकुश लांडगे यांची पुण्याई आणि ‘लांडगे पॅटर्न’मुळे रवि लांडगे यांना महापौरपद मिळाले. मात्र, प्रशासकीय अनुभवाची कमतरता असल्याने त्यांच्यासाठी हे ‘काटेरी मुकुट’ ठरू शकते.

  • स्थायी समिती: अध्यक्ष पदी अभिषेक बारणे असोत वा संदीप कस्पटे, समितीचा खरा रिमोट कंट्रोल ‘बाह्य केंद्रां’कडेच राहणार असून समिती केवळ हमालीचे काम करेल, असा टोला लगावण्यात आला आहे.

निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील मूलभूत प्रश्न जसे की:

  • अपुरा आणि दूषित पाणीपुरवठा (२४ तास पाण्याचे आश्वासन हवेतच विरले).

  • अनधिकृत बांधकामे, रेडझोन आणि पूररेषेचा प्रश्न.

  • नदी सुधारच्या नावाखाली हजारो कोटींचा घाट.

  • वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा वाढता धोका.

हे सर्व प्रश्न बाजूला सारून केवळ ‘मॅनेज’ केलेल्या पुरस्कारांच्या जोरावर उदोउदो केला जात आहे. पालिकेचा कर्जबाजारीपणा भरून काढण्यासाठी आता शहरवासियांच्या माथी करवाढीचा बोजा लादला जाण्याची दाट शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या काळातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून भाजपने सत्ता मिळवली, पण भाजपच्या नऊ वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला, असा आरोप ज्येष्ठ पत्रकार यांनी केला आहे. मारुती भापकर, भाऊसाहेब भोईर आणि सुलभा उबाळे यांनी पालिकेच्या कारभारावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. मात्र, केंद्र आणि राज्यात भाजपचेच सरकार असल्याने ही चौकशी होऊन कोणाला शिक्षा होईल, याची शाश्वती कमीच आहे.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!