news
मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर आनंदच; वडेट्टीवारांचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर अन् आरएसएसवर घणाघाती हल्लारस्ते अपघात पीडितांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाचे कडक पाऊल; विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल पंपांवर इंधन नाकारण्याच्या योजनेचा विचार करण्याचे निर्देशपरदेशातील प्रगत शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यासासाठी ‘फार्मर आयडी’धारक शेतकऱ्यांना मिळणार संधीपोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचा गुन्हेगारांना सज्जड इशारा; अवैध दारू व्यावसायिकांना ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत दणकासांगवीत ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस आणि विविध गुणगौरव सोहळा उत्साहात; ज्येष्ठांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा महासंघाचा ठाम निर्धार
Home मुख्यपृष्ठ मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर आनंदच; वडेट्टीवारांचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर अन् आरएसएसवर घणाघाती हल्ला

मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर आनंदच; वडेट्टीवारांचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर अन् आरएसएसवर घणाघाती हल्ला

गुजराती नेतृत्वावर टोला अन् विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सरकारला इशारा; विजय वडेट्टीवारांच्या विधानाने राजकीय खळबळ | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘नरेंद्र मोदींच्या जागी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान झाले तर आनंदच!’; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचे राजकीय विधान!

नागपूर/पिंपरी, प्रतिनिधी  दि. ५ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

नागपूर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भविष्याबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी एक महत्त्वपूर्ण आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारे विधान केले आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांच्या जागी जर एखादा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होत असेल, तर आम्हा सर्व मराठी लोकांना त्याचा निश्चितच अभिमान आणि आनंद होईल,” असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केले.

रविवारच्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस यांनी ‘माझ्या पुतण्यात देशाचा पंतप्रधान होण्याची क्षमता आहे,’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही (RSS) जोरदार निशाणा साधला.

बाळासाहेब फडणवीस यांच्या विधानाचा संदर्भ देत विजय वडेट्टीवार म्हणाले:

“नातेवाईक, भाऊ किंवा काकांना आपल्या माणसाबाबत अशी भावना वाटणे स्वाभाविक आहे. सध्या गुजरातचे दोनच लोक देशात कोणाचे काय होणार हे ठरवत आहेत. अशा परिस्थितीत जर मोदींच्या जागी देवेंद्रजी देशाचे पंतप्रधान झाले, तर आम्हा मराठी माणसांना खूप आनंद होईल. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचाही विकास व्हावा, हीच आमची इच्छा आहे.”

यावेळी त्यांनी भाजपच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर आणि नेतृत्वावर टीका करताना विचारले की, “केवळ दोन उद्योगपती आणि सोशल मीडियाच्या भरवशावर उभारलेले नेतृत्व देशात उद्या कसली लोकशाही आणि नेतृत्व निर्माण करणार?”

जंतरमंतर येथे ‘सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस’ (CJP) तर्फे आयोजित विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा उल्लेख करत वडेट्टीवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘देशद्रोही’ किंवा ‘अँटी-नॅशनल’ ठरवून आरटीआयच्या (RTI) माध्यमातून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “लाखो तरुण जेव्हा शांततेने रस्त्यावर उतरतात, तेव्हा त्यांना तुम्ही देशद्रोही म्हणता. हे कसले देशभक्तीचे लक्षण आहे? देशातील तरुणांना जर असेच देशद्रोही ठरवत राहिलात, तर येत्या काळात सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिला.

© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!