news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड AI ला मात देऊन करिअर घडवा!’ – शरदचंद्र पवारांचा बारामती येथील AI कार्यशाळेत युवा पिढीला मोलाचा सल्ला!

AI ला मात देऊन करिअर घडवा!’ – शरदचंद्र पवारांचा बारामती येथील AI कार्यशाळेत युवा पिढीला मोलाचा सल्ला!

कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी भावनांची जागा घेऊ शकत नाही'; तंत्रज्ञान शिका, पण बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवा - पवारांचे मार्गदर्शन. (मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे AI कार्यशाळा: ‘कृत्रिम बुद्धिमत्तेवर मात करून करिअर घडवा!’ – पवार साहेबांचा युवा पिढीला मोलाचा सल्ला!

‘एआय मानवी भावनांची जागा घेऊ शकत नाही’; तंत्रज्ञान शिका, पण बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवा – पवारांचे मार्गदर्शन!

बारामती, पुणे, दि. २० जून २०२५ (मॅक्स मंथन डेली न्यूज): बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘एआय क्षेत्रातील करिअर व संधी’ या महत्त्वपूर्ण कार्यशाळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence – AI) वाढत्या प्रभावाबाबत तरुणांना अत्यंत मोलाचा सल्ला दिला.


‘एआयला मर्यादा आहेत; ओरिजनल हे ओरिजनलच असते!’

पवार साहेब आपल्या भाषणात म्हणाले की, एआयने तंत्रज्ञानात मोठे बदल घडवले आहेत. पण तरीही ते मानवी मनाची, भावनांची जागा घेऊ शकत नाही, त्यालाही मर्यादा आहेत. ते पुढे म्हणाले की, “नवीन तंत्रज्ञान जरूर शिका, पण आपल्या बुद्धिमत्तेला कधीही विसरू नका. कारण आपण जी माहिती त्या तंत्रज्ञानाला देत आहोत, तीच माहिती तो आपल्याला देत आहे. एआयने अनेक गोष्टी करता येतात, पण ‘ओरिजनल हे ओरिजनलच असते’, हे विसरून चालणार नाही,” असे त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा चुकीच्या पद्धतीनेही वापर होऊ शकतो, याबद्दल सावध केले. त्यांनी युवकांना स्वतःच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवण्यास, नवीन तंत्रज्ञान शिकून कृत्रिम बुद्धिमत्तेवर मात करून करिअर निर्माण करण्याचा सल्ला दिला. “एआयची मदत घ्या, पण त्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका. त्याची मदत घेऊन समाजाची सेवा करा,” असे आवाहनही त्यांनी केले.


पवार साहेबांनी स्वतःचेच उदाहरण दिले: ‘अनुभवावर विश्वास, म्हणूनच साठ वर्ष यशस्वी!’

शरदचंद्र पवार यांनी आपल्या स्वतःचेच उदाहरण देत, अनुभवाचे आणि बुद्धीच्या विश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “पवार साहेब कधीच सर्व्हेवर विश्वास ठेवत नाहीत, ते आपल्या अनुभवावर आणि बुद्धीवर विश्वास ठेऊन निर्णय घेतात. त्यामुळे साठ वर्ष झाले ते राजकारणात यशस्वी होत आहेत.”

यामुळे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात जरूर करा, पण त्याला आपल्या बुद्धिमत्तेच्या वरचढ होऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.


कार्यशाळेतील मान्यवर आणि उपस्थिती

या प्रसंगी प्रसिद्ध लेखक व उद्योजक अच्युत गोडबोले, वाॅशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे संचालक डॉ. लव खोत, आरजीएसटीचे सचिव डॉ. नरेंद्र शहा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. आदित्य अभ्यंकर, विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांच्यासह विद्या प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सभासद आदी उपस्थित होते. या कार्यशाळेतून युवकांना एआयच्या जगात करिअर घडवण्यासाठी योग्य दिशा मिळाली असल्याचे बोलले जात आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!