news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home मुख्यपृष्ठ “आरक्षणाचे खरे मारेकरी भाजपचेच लोक!” – ओबीसी बैठकीत डावलल्याने शरद पवार गट संतापला; मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान

“आरक्षणाचे खरे मारेकरी भाजपचेच लोक!” – ओबीसी बैठकीत डावलल्याने शरद पवार गट संतापला; मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण पाठवल्याचे पत्र माध्यमांसमोर सादर करा; लोकशाहीचा अपमान करण्याची सरकारची दुतोंडी भूमिका – राज राजापूरकर. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

ओबीसी बैठकीतून डावलल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; “फडणवीसांची ओबीसी आरक्षणावर दुटप्पी भूमिका”

 


 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) नेते राज राजापूरकर यांचा गंभीर आरोप; सरकारकडून ‘खोटा प्रचार’ करत असल्याचे थेट आव्हान.

 

मुंबई, दि.३ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावलेल्या बैठकीत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (शरदचंद्र पवार गट) हेतुपुरस्सर डावलण्यात आले, असा घणाघाती आरोप पक्षाचे नेते राज राजापूरकर यांनी केला आहे.

एका बाजूला बैठकीचे निमंत्रण न देता चर्चेपासून दूर ठेवायचे आणि दुसऱ्या बाजूला

‘शरद पवार गट ओबीसींच्या प्रश्नावर लढत नाही’ असा खोटा प्रचार करायचा, ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याची जळजळीत टीका राजापूरकर यांनी केली आहे.

 

‘लोकशाहीचा अपमान आणि दुतोंडीपणा’

 

आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विविध

ओबीसी संघटना आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीच्या संदर्भात बोलताना राज राजापूरकर म्हणाले की, “मुख्यमंत्री महोदयांनी अनेक संघटनांना आणि पक्षांना निमंत्रण देऊन बोलावले. पण आमच्या पक्षाच्या एकाही प्रतिनिधीला किंवा लोकप्रतिनिधीला या चर्चेसाठी निमंत्रण पाठवण्यात आले नाही. हा

लोकशाहीचा अपमान आहे.”

सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना ते म्हणाले, “एकीकडे ओबीसी आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर आम्हाला चर्चेत सहभागी करून घ्यायचे नाही आणि दुसरीकडे माध्यमांसमोर जाऊन

शरद पवार साहेब किंवा आमचा पक्ष ओबीसी हितासाठी सहभागी होत नाही, अशी चुकीची माहिती पसरवायची, हा दुतोंडीपणा आहे.”

 

भाजपवर ‘आरक्षणाचे मारेकरी’ असल्याचा गंभीर आरोप

 

राजापूरकर यांनी भारतीय जनता पार्टीवरही थेट निशाणा साधला. ते म्हणाले की, “

मंडल यात्रेच्या माध्यमातून भाजपचा ओबीसी आरक्षणाविरोधातील खरा चेहरा देशासमोर आला होता.” तोच चेहरा लपवण्यासाठी आज आमच्या पक्षाला या चर्चेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला असून, “जर आरक्षणाचे खरे मारेकरी कोणी असतील, तर ते भाजपचेच लोक आहेत,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

 

मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान

 

राष्ट्रवादी काँग्रेसला डावलले गेल्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी राज राजापूरकर यांनी सरकारला थेट आव्हान दिले आहे. “जर सरकार खरे बोलत असेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या पक्षाच्या कोणत्याही प्रतिनिधीला पाठवलेले

निमंत्रण पत्र माध्यमांसमोर सादर करून दाखवावे,” असे त्यांनी म्हटले.

राजापूरकर यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान,

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड शहर जिल्हा ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष भाई विशाल जाधव यांनी देखील महाराष्ट्र शासनाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!