news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home मुख्यपृष्ठ ‘शेतकरी जगला पाहिजे’! ५० हजारांची मदत न दिल्यास उपोषण; खासदार प्रणिती शिंदे आक्रमक

‘शेतकरी जगला पाहिजे’! ५० हजारांची मदत न दिल्यास उपोषण; खासदार प्रणिती शिंदे आक्रमक

पंढरपूरमधील अतिवृष्टी व पूरग्रस्त गावांना भेट; जिल्हाधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून भाटघर कॅनॉलचे पाणी त्वरित बंद करण्याची मागणी. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शेतकऱ्यांसाठी हजार रुपये हेक्टरी मदत द्या, अन्यथा उपोषणाचा इशारा!

 


 

खासदार प्रणिती शिंदे यांचा पंढरपूरमधील पूरग्रस्त गावांना भेट देऊन सरकारला निर्वाणीचा इशारा; भाटघर कॅनॉलचे पाणी त्वरित बंद करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

 

पंढरपूर/सोलापूर, प्रतिनिधी :- पंडित गवळी, दि. ऑक्टोबर , मॅक्स मंथन डेली न्यूज:

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. प्रणिती शिंदे यांनी आज पंढरपूर तालुक्यातील बोहाळी, अनवली आणि सरकोली या अतिवृष्टी व पूरग्रस्त गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी शेतकऱ्यांना सरसकट हजार रुपये हेक्टरी मदत द्या, अन्यथा उपोषण करू, असा निर्वाणीचा इशारा राज्य सरकारला दिला आहे.

‘जाहीर केलेली मदत तुटपुंजी’

 

या भेटीदरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे मान्य केले. शासनाने जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी असून ती शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखी आहे, अशी टीका त्यांनी केली.

खासदार शिंदे म्हणाल्या, ” सरकारने संवेदनशीलतेने वागून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट रुपये आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी. आज शेतकरी जगला पाहिजे, हेच सरकारचे सर्वात मोठे कर्तव्य आहे.”

 

निष्पक्ष पंचनाम्यांची मागणी

 

शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याची भूमिका मांडत त्यांनी नुकसानभरपाई वाढवून देण्याची मागणी केली.

  • त्यांनी स्पष्ट केले, “शेतकऱ्यांचे नुकसान भरून द्या, अन्यथा आम्ही उपोषणाला बसू.”
  • पंचनामे करताना कोणत्याही प्रकारचा दूजाभाव न करता सरसकट व निष्पक्ष पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

जिल्हाधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क

 

या भेटीदरम्यान अनवली गावातील शेतकऱ्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे भाटघर कॅनॉलचे अनावश्यक सुरू असलेले पाणी तात्काळ बंद करण्याची मागणी केली. कॅनॉलमधून सतत पाणी सोडल्याने शेतीच्या जमिनींना पाझर लागून मोठे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे होते.

शेतकऱ्यांची ही बाब लक्षात घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी त्वरित जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला आणि भाटघर कॅनॉलचे पाणी बंद करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात तात्काळ आवश्यक ती उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन खासदार शिंदे यांना दिले आहे.


© मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!