news
निष्ठा आणि त्यागाचे मिळणार फळ? माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासाठी समर्थकांकडून फिल्डिंग; भोसरीसह शहराच्या राजकारणात चर्चांना उधाणबिरदवडी हत्याकांड: आईशी असलेल्या संबंधांच्या रागातून मुलानेच रचला खुनाचा कट; मित्राच्या मदतीने जंगलात नेऊन केला अंतमहापालिकेच्या लेकींनी मुंबई गाजवली! टाकाऊ वस्तूंमधून साकारलेल्या कलेला महाराष्ट्रातून पहिला बहुमानपार्थ पवार की जय पवार? राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी पवार कुटुंबातील तरुण नेतृत्वाचे नाव चर्चेत; राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी अपडेटमॅरेथॉन आढावा बैठक आणि प्रत्यक्ष पाहणी! विकासकामातील दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; लोकप्रतिनिधींच्या आक्रमक पवित्र्याने अधिकाऱ्यांची धावपळ
Home मुख्यपृष्ठ रायगडमधील आदिवासी बांधवांचे ‘घरकुलाचे’ स्वप्न होणार साकार! मंत्री आदिती तटकरे यांची प्रशासनाला ‘डेडलाईन’

रायगडमधील आदिवासी बांधवांचे ‘घरकुलाचे’ स्वप्न होणार साकार! मंत्री आदिती तटकरे यांची प्रशासनाला ‘डेडलाईन’

नगरपंचायत हद्दीतील भूमिहीन आणि गरजू आदिवासी कुटुंबांसाठी मोठा निर्णय; १५४ घरांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याचे मंत्रालयातून आदेश. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

माणगाव, तळा आणि म्हसळ्यातील आदिवासी कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; मंत्री आदिती तटकरे यांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

 

 

१५४ लाभार्थ्यांना मिळणार प्रत्येकी २.५० लाखांचे अनुदान; शहरी भागातील आदिवासी कुटुंबांचा निवाऱ्याचा प्रश्न सुटणार

रायगड/मुंबई ,दि. ३१ डिसेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

मुंबई (दि. ३१ डिसेंबर २०२५): रायगड जिल्ह्यातील माणगाव, तळा आणि म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) पात्र लाभार्थ्यांना ‘आदिवासी घरकुल योजना (शहरी)’ अंतर्गत हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. या संदर्भातील घरकुलांचे प्रस्ताव तातडीने सादर करून निधी उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत.


मंत्रालयात आयोजित विशेष बैठकीत मंत्री आदिती तटकरे यांनी या तिन्ही नगरपंचायत क्षेत्रातील घरकुल वंचितांचा आढावा घेतला. यामध्ये एकूण १५४ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे:

  • माणगाव नगरपंचायत: ४५ लाभार्थी

  • तळा नगरपंचायत: ६९ लाभार्थी

  • म्हसळा नगरपंचायत: ४० लाभार्थी

या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येकी २.५० लाख रुपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव असून, या योजनेमुळे शहरी भागात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांना सुरक्षित आणि हक्काचे घर उपलब्ध होणार आहे.

बैठकीत मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, घरकुलांच्या मान्यतेसाठीचा निधी आणि पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी यावर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करून आदिवासी बांधवांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

या महत्त्वपूर्ण बैठकीस आदिवासी विभागाचे सहसचिव मच्छिंद्र शेळके, अतिरिक्त आयुक्त गोपीचंद कदम, तळा तहसीलदार स्वाती पाटील, माणगाव उपनगराध्यक्षा रिया उभारे यांच्यासह आनंद यादव, लक्ष्मी जाधव, दिलीप जाधव, ॲड. उत्तम जाधव, नाना भुवड, जगदिश शिंदे, नागेश लोखंडे, किशोर शिंदे, परशुराम कदम, अलिम पल्लवकर, लक्ष्मण हिलम, विजय तांबे, शाहीद उके आदी उपस्थित होते.

या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण असून, प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला घरांचा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!