news
सुगम बदली आणि शासकीय लाभ मिळवण्यासाठी बोगस दाखल्यांचा वापर; त्रिसदस्यीय चौकशी समितीच्या अहवालानंतर मोठी कारवाईशिक्षण सुधारणा आणि बेरोजगारीला राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा संकल्प; मुख्य प्रवक्ते सौरव दास, प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यासह कोअर टीमच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयअभ्यागतांच्या तक्रारी व निवेदने प्रत्यक्ष ऐकून घेत स्थळपाहणी व तातडीने कार्यवाहीचे आदेश; दर गुरुवारी ४ ते ६ नागरिकांसाठी विशेष वेळ राखीवपक्षाची धोरणे जनतेपर्यंत पोहोचवणे आणि विरोधकांच्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्याला मोठी संधीदिल्ली मेट्रो, नाशिक कुंभमेळा जलसुविधा प्रकल्पासह ऊर्जा आणि सौर क्षेत्रातील मोठ्या ऑर्डर्स प्राप्त; कंपनीची व्यवसायात सातत्यपूर्ण घोडदौड
Home औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) शिक्षण सुधारणा आणि बेरोजगारीला राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा संकल्प; मुख्य प्रवक्ते सौरव दास, प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यासह कोअर टीमच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

शिक्षण सुधारणा आणि बेरोजगारीला राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा संकल्प; मुख्य प्रवक्ते सौरव दास, प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यासह कोअर टीमच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

बेरोजगारी अन् शिक्षण सुधारणांना बनवणार राष्ट्रीय मुद्दा; कॉक्रोच जनता पार्टीच्या कोअर कमिटी बैठकीत अभिजीत दीपके यांचा संकल्प | © २०२६ मॅक्स मंथन DAILY NEWS

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘कॉक्रोच जनता पार्टी’ची देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ मोहीम; संस्थापक अभिजीत दीपके यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये घोषणा!

छत्रपती संभाजीनगर/पिंपरी, प्रतिनिधी दि. ७ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

छत्रपती संभाजीनगर: कॉक्रोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी गुरुवारी पक्षाच्या ‘क्या बोलती पब्लिक’ या देशभरातील मोहिमेची अधिकृत घोषणा केली. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या या मोहिमेद्वारे देशभरातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. या मोहिमेत बेरोजगारीचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर उपस्थित केला जाईल आणि शिक्षण क्षेत्रातील धोरणात्मक सुधारणांवर भर दिला जाईल, असे अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे अभिजीत दीपके यांच्या निवासस्थानी कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) दोन दिवशीय कोअर कमिटीच्या बैठकीचा समारोप झाला. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत CJP चे मुख्य प्रवक्ते सौरव दास, प्रवक्ते आशुतोष रांका आणि पक्षाचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना अभिजीत दीपके म्हणाले, “या मोहिमेच्या माध्यमातून देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल आणि जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांबद्दल लोकांचे काय मत आहे, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे.”
आपल्या प्राधान्यक्रमांवर प्रकाश टाकताना अभिजीत दीपके यांनी सांगितले,  बेरोजगारी ही देशातील सर्वात मोठी समस्या आहे. आम्ही याला राष्ट्रीय मुद्दा बनवणार आहोत.”  “शालेय शिक्षणापासूनच शिक्षण अत्यंत महागडे झाले असून त्याचा वापर नफा कमावण्यासाठी केला जात आहे. आम्हाला ही परिस्थिती बदलायची आहे.”

मुंबईत आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादावर भाष्य करताना अभिजीत दीपके म्हणाले, “मला वाटते की त्यांना खूप उशीर झाला आहे. २० जुलै रोजी जेव्हा विद्यार्थ्यांना मारहाण झाली, तेव्हाच त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधायला हवा होता. भाजपचे वैचारिक मार्गदर्शक असलेल्या मोहन भागवत यांनी स्वतः समोर येऊन त्या विद्यार्थ्यांना भेटायला हवे होते.”
ते पुढे म्हणाले, “जर हे आंदोलन झाले नसते आणि देशातील तरुण रस्त्यावर उतरले नसते, तर या लोकांनी ‘जेन झी’ (Gen Z) शी शेवटचे कधी भाषण केले होते? ‘हे लोक काय करतात? हे गंभीर नाहीत, फक्त इंस्टाग्रामवर नाचतात’ असे म्हणून त्यांची उडवाउडवी केली जात होती. होय, ते नाचतात, पण किमान तुमच्यासारखे रस्त्यावर दंगली तर करत नाहीत!”

नीट (NEET) पेपर लीक आणि परीक्षांमधील गैरप्रकारां विरोधात नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे CJP च्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाचा संदर्भ देत अभिजीत दीपके यांनी दावा केला की, या आंदोलनामुळेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला.
“धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे विद्यार्थी आंदोलनाचे सर्वात मोठे यश आहे,” असे सांगत अभिजीत दीपके म्हणाले की, या आंदोलनात केवळ विद्यार्थीच नाही तर बेरोजगार तरुणही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गेल्या १०-१२ वर्षांत या सरकारने लोकांच्या मनात निर्माण केलेली भीती आता संपली असून लोक हक्कासाठी रस्त्यावर उतरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारतातील ६० टक्के लोकसंख्या ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची असून जंतरमंतरवरील आंदोलनात याच युवा पिढीचा भरणा होता, असे अभिजीत दीपके यांनी नमूद केले.
पक्षाच्या वैचारिक चौकटीविषयी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले:
“कॉक्रोच जनता पार्टी (CJP) विकसित भारताच्या उभारणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या विचारांनुसार कार्य करेल. आमची विचारसरणी ही भारतीय संविधानावरच आधारित आहे.”
यावेळी माध्यमांची घसरलेली विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करण्याची आणि जनतेचा माध्यमांवरील विश्वास परत मिळवून देण्याची गरज असल्याचे मतही अभिजीत दीपके यांनी व्यक्त केले.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!