news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त बाबासाहेब त्रिभुवन यांचे आदरांजली; ‘फकिरा’ मधून डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा गौरव!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त बाबासाहेब त्रिभुवन यांचे आदरांजली; ‘फकिरा’ मधून डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा गौरव!

अण्णाभाऊंचे साहित्य आजही प्रेरणादायी; वंचित समाजाला आवाज देण्याचे कार्य काळाची गरज, माजी नगरसेवकांचे प्रतिपादन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे समाजातील वंचित आणि शोषित वर्गाचा बुलंद आवाज – बाबासाहेब त्रिभुवन

माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचे जयंतीनिमित्त साहित्यरत्नाला विनम्र अभिवादन

१ ऑगस्ट २०२५: “अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याद्वारे समाजातील वंचित आणि शोषित वर्गाला आवाज दिला. त्यांच्या लेखणीने सामाजिक क्रांतीची बीजे पेरली आणि त्यांचे विचार आजही समाजाला योग्य दिशा देत आहेत,” अशा शब्दांत माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

अण्णाभाऊ आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा वारसा

या विशेष प्रसंगी, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या जनसंपर्क कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी त्रिभुवन यांनी अण्णाभाऊंच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी त्यांनी निगडी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकालाही भेट देऊन आदरांजली वाहिली. त्रिभुवन म्हणाले की, अण्णाभाऊंनी लिहिलेल्या “फकिरा” या कादंबरीतील नायक हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होता. स्वाभिमानाने अन्यायाविरुद्ध बंड करणारा ‘फकिरा’ हे पात्र बाबासाहेबांच्या कार्याला वाहिलेली आदरांजलीच आहे.

आजच्या पिढीने या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेणे काळाची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाला भाई विशाल जाधव, सुरेश इंगळे (पाटील), राम मडके, प्रशांत कुंजीर, ब्रम्हा सूर्यवंशी, रत्नदीप राजूरकर, बाबासाहेब नांगरे पाटील, संदेश काटे, प्रमोद शिंदे यांच्यासह अनेक स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!