news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home सोलापूर गावाच्या विकासासाठी नवा नियम: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता आर्थिक शिस्त आवश्यक!

गावाच्या विकासासाठी नवा नियम: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता आर्थिक शिस्त आवश्यक!

थकबाकीदार उमेदवार नाही; नियमित कर भरणाऱ्यांसाठी ५० टक्के करमाफीची घोषणा. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

ग्रामपंचायत निवडणूक लढवायची आहे? आता ‘या’ व्यक्तीलाच संधी; थकबाकीदार नसलेल्यांसाठी नवा नियम लागू

 


 

‘समृद्ध पंचायतराज’ अभियानांतर्गत ५० टक्के करमाफीचा निर्णय; ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

 

सोलापूर, प्रतिनिधी पंडित गवळी ०९ सप्टेंबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी आता नवीन पात्रता लागू होण्याची शक्यता आहे. यापुढे ज्या व्यक्तींनी गेल्या पाच वर्षांत ग्रामपंचायतीच्या कराची थकबाकी भरली नाही, त्यांना निवडणूक लढवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सरकार लवकरच घेणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिरातील सरपंच कार्यशाळेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

गावांमधील कर वसुलीची मोठी समस्या लक्षात घेता, प्रशासनासाठी ही एक मोठी आव्हान ठरत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकार ‘समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवणार आहे.


 

अभियानांतर्गत करमाफी

 

या अभियानाचा एक भाग म्हणून, थकबाकी नियमित करण्यासाठी काही सवलती जाहीर केल्या जाणार आहेत. जे नागरिक अभियान कालावधीत एकरकमी कर भरतील, त्यांना ५० टक्के करमाफी देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे मंत्री गोरे यांनी सांगितले. यामुळे गावातील थकीत कर नियमितपणे शासनाच्या तिजोरीत जमा होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

मंत्री गोरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागाचे प्रश्न गावातच सोडवण्यासाठी सरकार काम करत आहे. शासनाच्या सर्व योजनांची एकत्रित अंमलबजावणी करून ग्रामीण जीवनमान उंचावण्याचा उद्देश आहे.


 

गायरान जमिनीवरील घरांसाठी नियम शिथिल

 

याच कार्यशाळेत चपळगावचे सरपंच सिद्धाराम यांनी गायरान जमिनीवर घरकुलांसाठी परवानगी मिळत नसल्याची तक्रार केली होती. यावर तात्काळ दखल घेत मंत्री गोरे यांनी, घरकुलांसाठीचे सर्व नियम आणि अटी शिथिल केले असल्याचे आश्वासन दिले. “९० दिवसांत घरकुलांची कामे पूर्ण करायची असतील, तर या अडचणी प्राधान्याने सोडवल्या गेल्या पाहिजेत. वेळ पडली तर नियम बदलू, कायदा बदलू, पण कामे थांबली जाणार नाहीत,” असे ठोस आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

हा निर्णय ग्रामीण भागातील पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!