news
खामगावमध्ये अण्णाभाऊ साठे पुतळ्यावरून संघर्ष पेटला! परिमल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ‘आक्रोश मोर्चा’तून प्रशासकीय कोंडी फोडण्याचा निर्धारपिंपळे गुरवमध्ये ‘काव्यात्मा’ पुरस्कारांचा सोहळा आणि कवी संमेलनाचा जागर! इरान्ना निंबाळ आणि निलेश शेंबेकर यांच्यासह ३५ कवींनी जिंकली रसिकप्रेक्षकांची मने“हिंद दी चादर” गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या चरणी सेवा अर्पण! महापौरांच्या तत्पर नियोजनामुळे हजारो भाविकांचा प्रवास झाला सुखकर“आजचे विद्यार्थीच घडवतील प्रदूषणमुक्त शहर!” वाकडमधील महापालिका शाळेत पथनाट्याद्वारे स्वच्छतेचा ‘ज्ञान आणि प्रेरणा’ संगम“कामगार चळवळीला दिशा देणारे अण्णासाहेब पाटील यांचे विचार आजही प्रेरणादायी!” पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे के.एस.बी. चौकात थोर नेत्याला वंदन
Home पिंपरी चिंचवड पिंपळे गुरवमध्ये ‘काव्यात्मा’ पुरस्कारांचा सोहळा आणि कवी संमेलनाचा जागर! इरान्ना निंबाळ आणि निलेश शेंबेकर यांच्यासह ३५ कवींनी जिंकली रसिकप्रेक्षकांची मने

पिंपळे गुरवमध्ये ‘काव्यात्मा’ पुरस्कारांचा सोहळा आणि कवी संमेलनाचा जागर! इरान्ना निंबाळ आणि निलेश शेंबेकर यांच्यासह ३५ कवींनी जिंकली रसिकप्रेक्षकांची मने

प्रसिद्ध लेखक श्रीकांत चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य सोहळा संपन्न! ज्येष्ठ गझलकार म.भा. चव्हाण यांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव; समाजाचा परिघ बदलण्यासाठी लेखणीचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन. | @ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love


लेखणीत बदलाची मोठी ताकद; लेखकाने सामाजिक मूल्यांची जपणूक करावी! पिंपळे गुरव येथे ‘काव्यात्मा’ राज्यस्तरीय पुरस्कारांचे दिमाखदार वितरण


पिंपळे गुरव प्रतिनिधी :आकाश कांबळे,२३ मार्च २०२६ | मॅक्स मंथन साहित्य विशेष:

पिंपळे गुरव : “प्रत्येकजण सूर्य होऊ शकत नाही, पण स्वतःपुरता काजवा नक्कीच होऊ शकतो. समाजाचा परिघ बदलण्याची ताकद लेखणीत आहे, याचे भान लेखकाने ठेवले पाहिजे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक श्रीकांत चौगुले यांनी केले. पिंपळे गुरव येथे आयोजित ‘काव्यात्मा’ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

याप्रसंगी ज्येष्ठ गझलकार म.भा. चव्हाण यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील गुणवंतांना गौरवण्यात आले. यावेळी चव्हाण यांच्या “आज माझे झाड झाले, दुःख दृष्टी आड झाले” या काव्यपंक्तींनी रसिकांची मने जिंकली.

या सोहळ्यात खालील मान्यवरांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले:

पुरस्काराचे नाव मानकरी (विजेते)
काव्य साधना जीवन गौरव इरान्ना निंबाळ
गझलकार प्रकाश बनसोडे सन्मान निलेश शेंबेकर
काव्य प्रतिभा सन्मान युवा कवी उमेंद्र बिसेन
शब्दप्रभू काव्य पुरस्कार संभाजी रणसिंग
सांस्कृतिक कार्य गौरव संदिप तापकीर
आदर्श शिक्षक पुरस्कार संजय मलवाड
युवा उद्योगरत्न पुरस्कार संतोष खवळे
श्रमप्रतिष्ठा पुरस्कार राजू जाधव

कार्यक्रमात बोलताना वृक्षमित्र अरुण पवार यांनी “घरातील माणसांच्या संख्येइतकी झाडे लावली पाहिजेत” असा संदेश दिला. तर वाघमोडे गुरुजींनी “शिक्षक आणि साहित्यिक हेच खऱ्या अर्थाने क्रांतीचे जनक आहेत,” अशा भावना व्यक्त केल्या. व्यंगचित्रकार लहू काळे यांनी शब्द आणि रेषांच्या माध्यमातून चांगला समाज घडवण्याचा निर्धार व्यक्त केला.

पुरस्कार वितरणानंतर माजी पोलीस अधिकारी आणि कवी आप्पा कसबेकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. “मनातील शब्दांची उकल झाल्याशिवाय जीवनात आनंद मिळणार नाही,” असे कसबेकर यांनी नमूद केले. या संमेलनात प्रमोद जगताप, प्रा. माया मुळे, रशिद अत्तार, योगिता कोठेकर यांच्यासह ३५ हून अधिक कवी-कवयित्रींनी विविध विषयांवर कविता सादर करून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष आत्माराम हारे यांनी केले, सूत्रसंचालन प्रतिमा काळेदादाभाऊ ओव्हाळ यांनी केले, तर आभार दत्तू ठोकळे यांनी मानले.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव।


You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!