news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home गुन्हेगारीउद्योग - व्यापार चाकण MIDC कामगारांचे प्रश्न गंभीर! कामगार आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज – जीवन येळवंडे यांचा एल्गार!

चाकण MIDC कामगारांचे प्रश्न गंभीर! कामगार आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज – जीवन येळवंडे यांचा एल्गार!

मूलभूत सुविधांचा अभाव, ठेकेदारीमुळे शोषण; चाकणमध्ये कामगार आयुक्तालय आणि सुसज्ज रुग्णालयाची मागणी!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर): चाकण औद्योगिक क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले असून, कामगार आयुक्त आणि सहाय्यक कामगार आयुक्तांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी व्यक्त केले आहे.

पूर्वी पिंपरी चिंचवडचा औद्योगिक परिसर कामगार आणि कंपन्यांसाठी ओळखला जात होता आणि म्हणूनच वाकडेवाडी येथे कामगार आयुक्त कार्यालय कार्यरत होते. मात्र, २००० साली चाकण MIDC ची स्थापना झाल्यानंतर येथे ४५० हून अधिक मोठ्या आणि शेकडो लहान कंपन्या सुरू झाल्या. आज २५ वर्षे उलटून गेली तरी, चाकण MIDC मध्ये कामगारांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे, याकडे येळवंडे यांनी लक्ष वेधले.

चाकणमध्ये ESIS (कर्मचारी राज्य विमा योजना) चे सुसज्ज रुग्णालय नाही. मोठ्या कारखान्यांमध्ये ठेकेदारी, स्थलांतरित आणि रोजंदारी कामगार मोठ्या संख्येने काम करतात. त्यांची योग्य नोंदणी करणे, त्यांच्या समस्या व तक्रारी जाणून घेणे आणि त्यांना कायद्यानुसार किमान वेतन, ESIS, साप्ताहिक सुट्ट्या यांसारख्या सुविधा मिळतात की नाही, हे पाहणे कामगार आयुक्तांच्या अखत्यारीत येते. मात्र, याकडे पुरेशा प्रमाणात लक्ष दिले जात नसल्याची खंत येळवंडे यांनी व्यक्त केली.

अपघात झाल्यास, जखमी कामगारांना पिंपरी चिंचवड येथील महापालिका रुग्णालय किंवा तुटपुंज्या सुविधा असलेल्या चिंचवडमधील ESIS रुग्णालयात घेऊन जावे लागते. अनेक कंपन्या ठेकेदार आणि कंत्राटी कामगारांमार्फत कामे करून घेतात, ज्यामुळे या कामगारांची जबाबदारी मूळ कंपनी घेत नाही. असंघटित कामगारांना अनेकदा भोजन आणि नाश्त्याची व्यवस्थाही मिळत नाही. आजही लाखो कामगार केवळ १२ ते १५ हजार रुपयांच्या तुटपुंज्या पगारात काम करत आहेत. त्यांना बस, रुग्णालय आणि आरोग्य सुविधांचा अभाव आहे. अनेक ठिकाणी महिला कामगारांना पाळणाघराची सोय नसल्यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागतो. सुट्टीच्या दिवशी कामाला बोलावले जाते आणि मासिक पाळीच्या रजा नाकारल्या जातात, असे गंभीर आरोप येळवंडे यांनी केले.

आज चाकण औद्योगिक क्षेत्रात चांगल्या दर्जाचे रस्ते, कामगार आयुक्त कार्यालय आणि कामगारांसाठी सुसज्ज ओपीडी तसेच कॉर्पोरेट दर्जाच्या सुविधा नसल्यामुळे कामगार आणि उद्योजक दोघांनाही अडचणी येत आहेत. येथे ठेकेदार आणि स्थलांतरित कामगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने या ठिकाणी कामगार आयुक्त कार्यालय आणि सर्व सोयींनी युक्त मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल स्थापन करावे, अशी मागणी जीवन येळवंडे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

#चाकणMIDC #कामगार #जीवनयेळवंडे #स्वाभिमानीश्रमिककामगारसंघटन #कामगारआयुक्त #ESISरुग्णालय #ठेकेदारी #असंघटितकामगार #मूलभूतसुविधा #औद्योगिकविकास #पिंपरीचिंचवड

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!