news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड रौप्यमहोत्सवी सोहळ्यात साहित्य आणि समाजसेवेचा संगम!

रौप्यमहोत्सवी सोहळ्यात साहित्य आणि समाजसेवेचा संगम!

आर्य समाज पिंपरीचा ‘श्रावणधारा’ काव्य संमेलन आणि पुरस्कार सोहळा; कवींनी सादर केल्या प्रबोधनपर कविता. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

‘निसर्ग हा मानवाचा पहिला गुरू’: आर्य समाज पिंपरी येथे राज्यस्तरीय काव्य संमेलन आणि पुरस्कार सोहळा

 


ज्येष्ठ लेखिका वर्षाराणी मुस्कावाड यांचे प्रतिपादन; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव

 

१८ ऑगस्ट २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

पिंपरी, पुणे: ‘निसर्ग हा मानवाचा पहिला गुरू आहे आणि निसर्गाशी संवाद साधण्याचे काव्य लेखन हे एक उत्तम माध्यम आहे,’ असे प्रतिपादन नांदेड येथील ज्येष्ठ लेखिका वर्षाराणी मुस्कावाड यांनी केले. पिंपरी येथील आर्य समाज संस्थेतर्फे आयोजित रौप्य महोत्सवी राज्यस्तरीय श्रावणधारा कविसंमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या.

यावेळी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शितल मालुसरे, उद्योजक श्रीहरी कुलकर्णी, आर्य समाज पिंपरीचे प्रमुख मुरलीधर सुन्दराणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार प्रदान सोहळा

 

या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘राज्यस्तरीय समाजभूषण व कार्यगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले:

  • दत्ता सूर्यवंशी (क्रीडा)
  • शुभांगी शिंदे (साहित्य)
  • सुधीर फेंगसे (कामगार)
  • नवनाथ मोरे (सामाजिक)
  • मारुती बाणेवार (पत्रकारिता)
  • सीमा गांधी (पर्यावरण)
  • रवींद्र कुरवडे (औद्योगिक)
  • वैजू चांदवले (कला)

कवींनी विविध विषयांवर केले काव्यवाचन

 

या कविसंमेलनात उपस्थित कवींनी श्रावणधारा, देशभक्ती, मानवी जीवन, राष्ट्रवाद, शेतकरी समस्या, भ्रष्टाचार, पर्यावरण आणि भारतीय संस्कृती अशा विविध सामाजिक विषयांवर प्रबोधनपर कविता सादर केल्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र सगर यांनी केले, तर उत्तम दंडीमे यांनी प्रास्ताविक केले आणि नलिनी देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


© 2025 मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!