news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home मुख्यपृष्ठ महिलांचा एल्गार, नागपूर ठप्प! – कर्जमुक्ती आणि हमीभावासाठी ‘शेतकरी राजधानी’ धगधगली; सर्व प्रमुख शेतकरी नेते एकाच मंचावर

महिलांचा एल्गार, नागपूर ठप्प! – कर्जमुक्ती आणि हमीभावासाठी ‘शेतकरी राजधानी’ धगधगली; सर्व प्रमुख शेतकरी नेते एकाच मंचावर

"आता पाहणं संपलं - आम्हीही लढू!" या निर्धाराने हजारो शेतकरी बहिणी रस्त्यावर; नागपूरकरांकडून आंदोलकांना माणुसकीचं दर्शन. (© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज )

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

 

शेतकऱ्यांचा ‘महाएल्गार’ धगधगला! २४ तासांपासून नागपूर पूर्ण ठप्प; बहिणींचे रणशिंगे आणि तरुणाईच्या सहभागामुळे आंदोलनाला स्फोटक वळण

 


 

मा. बच्चू कडूंचा सरकारला थेट इशारा: “तोडगा न निघाल्यास उद्या नागपूरच्या प्रत्येक चौकात शेतकरी दिसेल!”

 

नागपूर, दि. ३० ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्ती, हमीभाव आणि कृषी समस्यांसाठी सुरू असलेल्या ‘महा एल्गार’ आंदोलनाने नागपूर शहर गेल्या २४ तासांपासून पूर्णपणे ठप्प केले आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवसानंतर आज नागपूरच्या रस्त्यांवर महिला आणि तरुणाईच्या अभूतपूर्व सहभागामुळे या लढ्याला एक नविन आणि स्फोटक वळण मिळाले आहे.

नागपूरच्या भूमीतून आज “शेतकऱ्यांच्या बहिणींचं रणशिंग” फुंकलं गेलं आहे. “आमच्या नवऱ्याचा सातबारा कोरा करायचा, आमच्या कष्टाला भाव मिळवायचा!” या निर्धाराने हजारो महिला हातात तिरंगे आणि “जय जवान जय किसान” चे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरल्या आहेत.

  • महिलांचा एल्गार: “आता पाहणं संपलं — आम्हीही लढू!” या निर्धाराने हजारो शेतकरी बहिणींनी आंदोलनाची सूत्रे हाती घेतली. “पुरुष राबतो, आम्ही पाहतो, आता पाहणं संपलं! आम्हीही राबू, आम्हीही लढू!” या घोषणांनी नागपूरचे वातावरण दणाणून गेले आहे. महिलांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला नवसंजीवनी मिळाली आहे.
  • तरुणाईचा ज्वालामुखी: गावागावातून आणि कॉलेजमधून युवकांनी आंदोलनात उडी घेतली आहे. “ही लढाई आमच्याही भवितव्याची आहे!” म्हणत तरुणाईच्या जोशामुळे आंदोलनात संघटन, शिस्त आणि आत्मविश्वासाचे नवे स्वर उमटले आहेत.

हजारो ट्रॅक्टर, जीप आणि दुचाक्यांवरून शेतकरी नागपूरकडे निघाले असून, रात्री उशिरापर्यंत महामार्गांवर नारे, डफली आणि रणशिंगांचा आवाज घुमत राहिला.

 

नागपूरच्या आंदोलन स्थळी आज महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शेतकरी नेते एकत्र आले. या नेत्यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला अधिक धार आली आहे. उपस्थित नेत्यांची नावे: मा. विजय जावंधिया, मा. वामनराव चटप, मा. राजू शेट्टी, मा. महादेव जानकर, मा. डॉ. अजित नवले, मा. बच्चू कडू, मा. रविकांत तुपकर, काँ. राजन क्षीरसागर, मा. प्रकाश पोहरे, मा. दीपकभाई केदार, मा. प्रशांत डिक्कर, मा. विठ्ठलराजे पवार त्यांच्या शब्द आणि जनतेचा संताप एकत्र येऊन नागपूर आज “शेतकरी राजधानी” बनलं आहे.

शेतकऱ्यांच्या महासागरासमोर बोलताना आमदार बच्चू कडू यांनी ठामपणे सांगितलं:

“आता मागे वळायचं नाही! सरकारनं तोडगा न काढल्यास उद्या नागपूरच्या प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक चौकात शेतकरी दिसेल! बहिणी, तरुणाई, शेतकरी सगळे मिळून या लढ्याला शेवटचं स्वरूप देणार!”

त्यांच्या या इशाऱ्याने आंदोलनस्थळी प्रचंड ऊर्जा निर्माण झाली आणि घोषणांनी आकाश भारून गेले: “शेतकरी जिंदाबाद!”

 

शहरातील नागपूरकरांनी शेतकऱ्यांसाठी मनमोकळं योगदान दिले आहे. अन्न, पाणी, चादरी, औषधं आणि पेट्रोल यांचा ओघ सतत सुरू आहे. काहींनी दुकानं बंद ठेवून आंदोलनात थेट सहभाग नोंदवला. “शेतकरी जिंकलाच पाहिजे, त्याच्यामुळेच महाराष्ट्र जगतो!” असा आवाज संपूर्ण महाराष्ट्राच्या गल्ली-बोळात ऐकू येत आहे.

आंदोलनाच्या स्फोटक पार्श्वभूमीवर उद्या नागपूरकडे लोकसागराचा महापूर येणार आहे. वर्धा, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतून शेतकऱ्यांचे ताफे रवाना झाले आहेत. ट्रॅक्टर, जीप आणि दुचाक्यांचे रांगा नागपूरकडे सरकत आहेत.

“शासनाचं मौन म्हणजे अन्यायाची शिक्कामोर्तब. आता या भूमीत अन्याय सहन केला जाणार नाही! हा लढा आता थांबणार नाही!” हा आवाज आता फक्त शेतकऱ्यांचा नाही, तो मातांच्या आक्रोशाचा, बहिणींच्या निर्धाराचा आणि तरुणाईच्या आत्मसन्मानाचा धगधगता शपथवाक्य बनला आहे.


© २०२५ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!