news
‘माझ्या लाइफचं सोल्युशनच नाही’ ते यूट्यूबवरील शेवटचा व्हिडिओ; छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने राज्य हादरले!शेतकरी आणि गावकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर मुख्यमंत्री विजय यांची विधानसभेत घोषणा; दुसऱ्या पर्यायी जागेचा शोध सुरूक्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त कष्टकरी कामगारांकडून आदरांजली; कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वात सामाजिक व संघटन पर्व अधिक बळकटब्लास्टिंगमुळे कचऱ्याचा डोंगर खचण्याची भीती; उच्चस्तरीय चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची मागणी१४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्च २०२६ अखेर पावणेतीनशे कोटींच्या ठेवी अन् १ कोटी ७१ लाखांचा नफा जाहीर
Home मुख्यपृष्ठ शेतकरी आणि गावकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर मुख्यमंत्री विजय यांची विधानसभेत घोषणा; दुसऱ्या पर्यायी जागेचा शोध सुरू

शेतकरी आणि गावकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर मुख्यमंत्री विजय यांची विधानसभेत घोषणा; दुसऱ्या पर्यायी जागेचा शोध सुरू

शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय; परंदूर हरितक्षेत्र विमानतळ प्रकल्प अधिकृतपणे रद्द | © २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय; परंदूर येथील प्रस्तावित विमानतळ प्रकल्प रद्द!

चेन्नई, प्रतिनिधी दि. २४ ऑगस्ट २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज:

चेन्नई: तमिळनाडू सरकारने चेन्नईसाठी प्रस्तावित केलेला परंदूर येथील हरितक्षेत्र (Greenfield) विमानतळ प्रकल्प अधिकृतपणे रद्द (Drop) करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी विधानसभेत नियम ११० अंतर्गत निवेदन देताना ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
प्रस्तावित विमानतळामुळे मोठ्या प्रमाणावर सुपीक शेतजमीन आणि स्थानिक रहिवाशांची घरे बाधित होणार असल्याने, तसेच स्थानिकांचा तीव्र विरोध असल्याने हा प्रकल्प रद्द करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
 परंदूर आणि आसपासच्या १२ गावांतील शेतकरी व नागरिक या प्रकल्पाला सातत्याने विरोध करत होते. “शेतकरी देशाचा पाठीचा कणा आहेत आणि त्यांच्या उपजीविकेवर पाणी फेरून विकास साधता येणार नाही,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
चेन्नईच्या वाढत्या प्रवासी व व्यावसायिक गरजा लक्षात घेता नवीन विमानतळाची गरज आहे, परंतु त्यासाठी कमीत कमी शेतजमीन बाधित होईल अशा इतर पर्यायी जागांची चाचणी केली जात आहे.
नवीन विमानतळ होईपर्यंत सध्याच्या चेन्नई (मीनमबाक्कम) विमानतळाच्या उत्तर-पश्चिम बाजूला पाचवे टर्मिनल (Terminal 5) उभारण्यात येणार आहे, ज्यामुळे वर्षाला २ कोटी अतिरिक्त प्रवाशांची क्षमता वाढेल.

 

या निर्णयावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्ष असलेल्या ‘द्रमुक’ने (DMK) या निर्णयावर कडक टीका करत, राजकीय कारणांसाठी प्रकल्प रद्द केल्यास राज्याचे आर्थिक नुकसान होईल आणि उद्योग शेजारच्या आंध्र प्रदेशात जातील असा दावा केला. या मुद्द्यावर विरोधी पक्षाने सभागहातून सभात्याग (Walkout) केला.
© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!