news
“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ“७ मार्चच्या जबरी चोरीचा छडा, सोन्याचे मिनी गंठण जप्त!” हिंजवडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार साथीदार विशाल काळेचा शोध सुरू, परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला चाप
Home मावळमहाराष्ट्र टेंभुर्णीत ‘महाराजस्व अभियान’ यशस्वी! नागरिकांना एकाच ठिकाणी मिळाल्या शासकीय सेवा!

टेंभुर्णीत ‘महाराजस्व अभियान’ यशस्वी! नागरिकांना एकाच ठिकाणी मिळाल्या शासकीय सेवा!

महसूल, वन विभागाच्या पुढाकाराने आरोग्य, ग्रामपंचायत, कृषी आणि इतर विभागांच्या सेवा तत्काळ उपलब्ध!

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

टेंभुर्णी (सोलापूर) [मॅक्स मंथन डेली न्यूज] प्रतिनिधी पंडित गवळी:- टेंभुर्णी आणि परिसरातील नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे आयोजन केले होते. या उपक्रमामुळे टेंभुर्णी सर्कलच्या गावांतील नागरिकांना शासकीय दाखले, प्रमाणपत्रे आणि विविध सेवा एकाच ठिकाणी तत्काळ उपलब्ध झाल्या.

या अभियानात आरोग्य विभागाने १६०० नागरिकांना सेवा दिली, तर ग्रामपंचायत विभागाने १५०, कृषी विभागाने ७० आणि महावितरणने ८५ सेवा पुरवल्या. यासोबतच, भूमी अभिलेख विभागाने ४८, उत्पन्न दाखले ३४५ आणि अधिवास दाखले १०८ नागरिकांना देण्यात आले. केवळ मनुष्यबळालाच नव्हे, तर १०० हून अधिक जनावरांनाही लसीकरण या अभियानात करण्यात आले.

या उपक्रमामुळे टेंभुर्णी पंचक्रोशीतील नागरिकांचे अनेक दिवसांपासून रखडलेले प्रश्न आणि शासकीय कामे जागेवरच मार्गी लागली. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना विविध दाखले आणि प्रमाणपत्रांसाठी होणारी धावपळ थांबली आणि त्यांना मोठा फायदा झाला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री. भारत आबा शिंदे, श्री. भारत नाना पाटील, श्री. बाळासाहेब तात्या ढवळे, सरपंच सौ. सुरजाताई बोबडे, श्री. रावसाहेब नाना देशमुख, माजी सरपंच श्री. प्रमोद कुटे, चेअरमन श्री. औदुंबरभाऊ देशमुख, श्री. वैभव देशमुख, श्री. वैभव कुटे, श्री. विलास पाटील, श्री. विजय कोकाटे, श्री. पप्पू कदम यांच्यासह तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे, नायब तहसीलदार श्री. भडकवाड साहेब, सर्कल ऑफिसर श्री. शेळवणे साहेब आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!