Home पिंपरी चिंचवड वैष्णवीसाठी पिंपरीत शिवसेनेचा आक्रोश! आरोपींना प्रतिकात्मक फाशी!

वैष्णवीसाठी पिंपरीत शिवसेनेचा आक्रोश! आरोपींना प्रतिकात्मक फाशी!

मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्या; युवतींची संतप्त मागणी!

by maxmanthannews@gmail.com

पिंपरी-चिंचवड (मॅक्स मंथन डेली न्यूज): वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने पिंपरी-चिंचवडमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवीला न्याय मिळावा, यासाठी शिवसेनेने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात पिंपरी-चिंचवडच्या युवतींनी आरोपींना प्रतिकात्मक फाशी देऊन वैष्णवीला अनोखी श्रद्धांजली वाहिली.

शुक्रवार, २३ मे २०२५ रोजी झालेल्या या आंदोलनात युवतींनी हातात प्रतिकात्मक फाशीचे दोर धरून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. वैष्णवीच्या मारेकऱ्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा व्हावी आणि हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे यांच्या पुढाकारातून हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात पुणे जिल्हा संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे, बाळासाहेब वाल्हेकर, शहर प्रमुख निलेश तरस, शहर संघटिका सरिता साने, उपजिल्हाप्रमुख युवा सेना राजेंद्र तरस, चिंचवड विधानसभा शहर संघटक संतोष सौंदणकर, उपशहर प्रमुख ॲड मुकुंद ओव्हाळ, भोसरी शहर प्रमुख अजिंक्य उबाळे, सुहास तळेकर, शुभम महाडिक, युती सेना उपजिल्हाप्रमुख सायली साळवी, उपशहर प्रमुख अंकुश कोळेकर, महिला विभाग प्रमुख सुवर्णा कुटे, चिंचवड विभाग प्रमुख संतोष बारणे, उपशहर प्रमुख शशिकला उभे, संघटक सुदर्शन देसले, उपशहर प्रमुख महेश कलाल, उपशहर प्रमुख दिलीप कुसाळकर, उद्योग सेनेचे कार्तिक गोवर्धन, युवा सेना जिल्हा समन्वयक सागर, उपजिल्हाप्रमुख दिलीप पांढरकर, विभाग प्रमुख आकाश बारणे, पिंपरी चिंचवड सभाप्रमुख निखिल देवले, सुबोध श्रीवास्तव यांच्यासह मोनिका उबाळे, सुलोचना महाकाळ, प्राची पाटील, नयना पारखे, ममता कदम, दीपा जखाते, शिल्पा भोंडवे, भारती चकवे, संगीता तुपके, कावेरी परदेशी, सागर शिंदे, अमित शिंदे आणि युवा सेना व महिला आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी युवतींनी विवाह संस्थेबद्दल परखड प्रश्न उपस्थित केले. “पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही हुंडाबळी जात असतील, तर हे लांछनास्पद आहे,” असे त्यांनी म्हटले.

सुलभा उबाळे म्हणाल्या, “विवाह संस्था भारतीय संस्कृतीतील आदर्श उदाहरण आहे. मात्र, काही घटनांमुळे या संस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समाजात अशा घटना वाढत असतील, तर विचार करण्याची गरज आहे. विवाह संस्थेबद्दल युवतींची मानसिकता निराशाजनक होत आहे. यावर उपाय करणे आणि अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचणे गरजेचे आहे.”

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!