news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home पिंपरी चिंचवड मिलिंदनगर एसआरए प्रकल्प: पावसामुळे दुर्गंधी, कंपाउंड लावण्याची मागणी!

मिलिंदनगर एसआरए प्रकल्प: पावसामुळे दुर्गंधी, कंपाउंड लावण्याची मागणी!

युवा नेते सुहास कुदळेंचा पालिका प्रशासनाला इशारा. (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

मिलिंदनगर SRA प्रकल्प: पावसामुळे अस्वच्छता, सुरक्षेसाठी कंपाउंडची मागणी (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी)

पिंपरी: पिंपरीतील मिलिंदनगरमधील SRA प्रकल्प परिसरात पावसाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. चिखल, साचलेले पाणी आणि कचऱ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर युवा नेते सुहास कुदळे यांनी तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

सुहास कुदळे यांनी पालिका प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रकल्पस्थळी पावसाचे पाणी साचल्याने खड्डे निर्माण झाले आहेत आणि याच ठिकाणी लहान मुले खेळतात. यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता आहे. या गंभीर परिस्थिती लक्षात घेता, संपूर्ण परिसरात पत्र्याचे कंपाउंड लावणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित केली जाईल.

सध्या सुरू असलेल्या प्रकल्पामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित कार्यवाही करण्याची गरज आहे. प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी सुहास कुदळे यांनी केली आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!