news
“तमाशा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक लोकचळवळ”; पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी उलगडला खडतर जीवनप्रवास; शास्त्रीय संगीताच्या जोडणीने कलेला दिली नवी उंचीफेकून देण्यापेक्षा ‘दान’ करा! महापालिकेच्या RRR केंद्रांतून गरजूंना मिळणार नवी उभारी; खेळणी, कपडे आणि पुस्तकांसाठी शहरात ठिकठिकाणी सोयजगाचा सिनेमा आता पिंपरी-चिंचवडकरांच्या दारात! ११६ निवडक चित्रपटांचे मोफत प्रदर्शन; ‘सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक’ पुरस्काराचे विशेष आकर्षणपिंपरी-चिंचवडकरांनो, मालमत्ता कराच्या जप्तीची कारवाई टाळा! महापालिकेची ‘अभय योजना’ उद्यापासून सुरू; २ लाख थकबाकीदारांना मोठा दिलासासमाजजागृतीचा प्रेरक प्रवास पुस्तकरूपाने समोर! भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांची प्रमुख उपस्थिती; तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार ‘संघर्षयात्रा’
Home अकोला महामार्गावर आंदोलकांचा ठिय्या! ५३ ठिकाणच्या ‘रास्ता रोको’मुळे अकोला-अमरावती वाहतूक विस्कळीत; शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे जमा करण्याची मागणी

महामार्गावर आंदोलकांचा ठिय्या! ५३ ठिकाणच्या ‘रास्ता रोको’मुळे अकोला-अमरावती वाहतूक विस्कळीत; शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे जमा करण्याची मागणी

अकोला जिल्ह्यात शिवबंधनाचा एल्गार; पीक विमा आणि अमेरिका करारावरून सरकारला घेरले, महामार्गावर वाहनांच्या किलोमीटर्सपर्यंत रांगा. (@ २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज)

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

शेतकऱ्यांसाठी शिवसैनिक रस्त्यावर! मूर्तीजापुरात महामार्गावर ‘रास्ता रोको’; ५३ ठिकाणी आंदोलनामुळे अकोला-अमरावती महामार्ग ठप्प


अकोला /मुर्तिजापुर प्रतिनिधी विलास सावळे, २७ फेब्रुवारी २०२६ | मॅक्स मंथन डेली न्यूज:

मूर्तीजापूर : शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अकोला-अमरावती महामार्गावर जोरदार ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर आणि मंगेश काळे यांच्या आवाहनानुसार संपूर्ण जिल्ह्यात ५३ ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले, ज्याचा मोठा फटका महामार्गावरील वाहतुकीला बसला.

आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मांडल्याने दुतर्फा ट्रॅक्टर, डंपर आणि मालवाहू वाहनांच्या कित्येक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. तासनतास वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले, मात्र शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते.

आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र निषेध केला. प्रामुख्याने खालील मागण्या मांडण्यात आल्या:

  • अमेरिका करार रद्द करा: भारत सरकारने अमेरिकेसोबत केलेले शेतकरी विरोधी करार तातडीने रद्द करावेत.

  • पीक विम्याचा निधी: राज्य सरकारने जाहीर केलेली पीक विम्याची हेक्टरी १७,००० रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावी.

  • सरकारी धोरणांचा निषेध: शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला.

मूर्तीजापूर बायपाससह शेलू बाजार, धोत्रा फाटा, लाखपुरी फाटा आणि सिरसो फाटा परिसरात शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाचे नेतृत्व तालुकाप्रमुख गजानन चौधरी यांनी केले. यावेळी चंद्रकांत तिवारी, अरविंद तायडे, अमोल तांबडे, छबीले पाटील, बंडू पाटील लांडे, विकास लकडे, उदय शिंदे, विजय साबळे, विलास देशमुख, रेखाताई कराड, ज्योतीताई लोखंडे, रेश्माताई चव्हाण आणि इतर शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

“जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल!” असा इशारा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.


© २०२६ मॅक्स मंथन डेली न्यूज. सर्व हक्क राखीव.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!