Home पिंपरी चिंचवड चिखलीतील शेतकऱ्यांचा आक्रोश! अन्यायकारक आरक्षण रद्द करण्याची मागणी!

चिखलीतील शेतकऱ्यांचा आक्रोश! अन्यायकारक आरक्षण रद्द करण्याची मागणी!

आमदार महेशदादा लांडगे मैदानात; भूमिहीन शेतकऱ्यांसाठी लढणार!

by maxmanthannews@gmail.com
0 comments

चिखलीतील अन्यायकारक आरक्षण! १७५ एकर जमिनीवरील शेतकरी होणार भूमिहीन; आमदार महेशदादा लांडगे शेतकऱ्यांच्या मदतीला धावले! (मॅक्स मंथन डेली न्यूज, पिंपरी-चिंचवड)

चिखली (पिंपरी-चिंचवड): पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रस्तावित नवीन विकास आराखड्यात (डीपी) चिखली परिसरातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. या आराखड्यात टाकण्यात आलेल्या एसएसीसी (Special Amenity and Commercial Corridor) या अन्यायकारक आरक्षणामुळे टाळगाव चिखली, जाधववाडी, कुदळवाडी, रोकडे वस्ती आणि आहेरवाडी या भागांतील तब्बल १७५ एकर जमिनीचे मूळ मालक, पिढ्यानपिढ्या शेती करणारे शेतकरी आता भूमिहीन होणार आहेत. या अन्यायकारक निर्णयाविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी आज श्री संत सावतामाळी मंदिरात एकत्र येत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.

या महत्त्वपूर्ण बैठकीत आपल्या जमिनी वाचवण्यासाठी आणि आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी मोठ्या संख्येने भूमिहीन शेतकरी आणि परिसरातील ग्रामस्थ सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच, भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आणि नेहमीच जनतेच्या पाठीशी उभे राहणारे आमदार महेशदादा लांडगे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आणि या आरक्षणामुळे होणारे नुकसान आमदारांना सांगितले. पिढ्यानपिढ्या ज्या जमिनीवर त्यांनी घाम गाळला, ती जमीन आता एका क्षणात त्यांच्या हातून जाणार या विचाराने ते हवालदिल झाले होते. आपल्या भावना व्यक्त करताना अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

आमदार महेशदादा लांडगे यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि त्यांना धीर देत म्हणाले, “तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या न्यायासाठी मी तुमच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. हे जे एसएसीसीचे आरक्षण टाकण्यात आले आहे, ते उठवण्यासाठी मी माझ्या परीने शक्य ते सर्व प्रयत्न करेन. एवढेच नव्हे, तर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या आरक्षणामुळे जातील, त्यांना पुन्हा त्या जमिनी निवासी झोनमध्ये कशा मिळवता येतील, यासाठी मी पाठपुरावा करेन.”

आमदारांच्या या आश्वासनामुळे शेतकऱ्यांमध्ये एक नवी उमेद निर्माण झाली. टाळगाव चिखली आणि परिसरातील नागरिकांनी आमदार लांडगे यांच्या भूमिकेचे जोरदार स्वागत केले आणि या लढ्यात त्यांच्यासोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

आता सर्वांचे लक्ष आमदार महेशदादा लांडगे यांच्या पुढील कृतीकडे लागले आहे. ते या भूमिहीन शेतकऱ्यांसाठी नेमके कोणते प्रभावी पाऊल उचलणार आणि या अन्यायकारक आरक्षणाला कसा विरोध करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, एका गोष्ट नक्की आहे, आमदार लांडगे यांच्या मैदानात उतरल्यामुळे चिखलीतील भूमिहीन शेतकऱ्यांच्या लढ्याला निश्चितच बळ मिळाले आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!