124
अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या ‘थेट कर्ज’ योजनेतील १२५ लाभार्थ्यांची २८ ऑक्टोबरला ‘ईश्वर चिठ्ठी’द्वारे निवड
१ लाख रुपये प्रकल्प मर्यादेची योजना; १७३ पात्र अर्जांमधून ६३ पुरुष आणि ६२ महिलांची निवड होणार
अमरावती, प्रतिनिधी अविनाश वानखेडे, दि. १८ ऑक्टोबर २०२५, मॅक्स मंथन डेली न्यूज:
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट लाभाच्या योजनेतील लाभार्थ्यांची निवड आता ईश्वर चिठ्ठीद्वारे (सोडत) केली जाणार आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांपैकी १२५ (एकशे पंचवीस) लाभार्थ्यांची निवड या सोडतीद्वारे होईल.
ही सोडत मंगळवार, दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी चार वाजता काढण्यात येणार आहे.
-
निवड होणारे लाभार्थी: सोडतीद्वारे एकूण १२५ लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यात ६३ (सहासष्ठ) पुरुष आणि ६२ (बासष्ठ) महिला लाभार्थींचा समावेश असणार आहे.
-
योजनेची मर्यादा: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनेची प्रकल्प मर्यादा एक लाख रुपये (१,००,००० रुपये ) आहे.
-
प्राप्त अर्ज: योजनेंतर्गत एकूण १७५ कर्ज मागणी अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी १७३ (एकशे तिहत्तर) अर्ज पात्र ठरले आहेत. पात्र अर्जांमध्ये ११९ (एकशे एकोणीस) पुरुष आणि ५४ (चोपन्न) महिला अर्जदारांचा समावेश आहे.
