news
“येरवडा कारागृहातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिली गुन्ह्यांची कबुली!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; महाळुंगे आणि तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरातील चोरीचे धागेदोरे उघड“सुरक्षेसोबतच कौटुंबिक जिव्हाळा देण्याचे कर्तव्य!” पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ज्येष्ठानुबंध’ उपक्रम यशस्वी; २८,००० हून अधिक ज्येष्ठांची डिजिटल नोंदणी पूर्ण“कोणतीही लेखी परीक्षा नाही, केवळ गुणवत्तेवर आधारित निवड!” पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची २३ मार्च ही शेवटची तारीख; ग्रुप-डी भरतीमध्ये २०% आरक्षणाचा मिळणार लाभ“उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका!” अपूर्ण जाहिरात प्रक्रियेमुळे ६८९ झाडे तोडण्याचा प्रस्ताव तहकूब; वृक्ष अधिकारी विजय नायकल यांनी तांत्रिक त्रुटी मान्य करत शिफारस वरिष्ठ स्तरावर धाडली“अवघ्या २० दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत ८० कोटींचा महसूल!” थकबाकीदारांना आतापर्यंत १९.१५ कोटींची भरघोस सवलत; ३१ मार्चपर्यंत एकरकमी कर भरणाऱ्यांनाच मिळणार लाभ
Home मुख्यपृष्ठराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय केंद्राची आंतरजातीय विवाह योजना बंद

केंद्राची आंतरजातीय विवाह योजना बंद

आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना मिळणारे अर्थसहाय्य थांबले

by maxmanthannews@gmail.com
Spread the love

आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना मिळणारे अर्थसहाय्य थांबले

नागपूर(मॅक्स मंथन डेली न्यूज): केंद्र सरकारने जातीय भेदभाव कमी करण्यासाठी सुरू केलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना अचानक बंद केली आहे. या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना २ लाख ५० हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य दिले जात होते.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनने २०१४-१५ मध्ये ही योजना सुरू केली होती. मात्र, कोणतीही स्पष्टexit कारण न देता ही योजना आता बंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या लोकांनी या योजनेसाठी अर्ज केले होते, त्यांना थेट योजना बंद झाल्याचे पत्र समाज कल्याण विभागाकडून पाठवले जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत, आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना केंद्र सरकारकडून २ लाख ५० हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य मिळत होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांपैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीतील असणे आवश्यक होते. तसेच, विवाहाच्या एका वर्षाच्या आत परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे आणि राज्याच्या समाज कल्याण विभागाकडे अर्ज करणे आवश्यक होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या संकेतस्थळावर आजही ही योजना सुरू असल्याचे दिसते. परंतु, पात्र अर्जदारांना समाज कल्याण विभागाने पत्र पाठवून योजना बंद झाल्याचे कळवले आहे. सामाजिक न्याय आयुक्तालयानेही सर्व जिल्ह्यांच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठवले आहे.

आंतरजातीय विवाहांचे अल्प प्रमाण

जात आणि धर्माच्या भिंती ओलांडून विवाह करणाऱ्यांचे प्रमाण आजही भारतात खूप कमी आहे. अनेक संस्थांच्या अहवालानुसार, हे प्रमाण केवळ ५ टक्के आहे.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!